किल्ला प्रतापगड
प्रतापगड हा महाराष्ट्रातील
एक प्रशिद्ध असा डोंगरी किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात
महाबळेश्वरच्या नैऋत्य दिशेला १३ कि.मी.
अंतरावर हा किल्ला आहे. प्रतापगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची १,०८१ मी. आहे.
गडाच्या दोन्ही बाजूनी जवळ जवळ २५० मी. खोल असलेली दरी आहे. हा किल्ला शिवाजी
महाराजांनी बांधलेला असून जावळी जिंकल्यानंतर १६५६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांना हा
किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. या किल्ल्याचे बांधकाम दोन भागात विभागले असून
मुख्य्कील्ला आणि बालेकिल्ला अशा या इमारती आहेत. दोन्ही भागात पाण्यासाठी तलाव
असून किल्याच्या चारही बाजूला संरक्षणसाठी भक्कम तटबंदी आणि बुरुज आहे. बुरुजांची
उंची १० ते १५ मी. आहे. या बुरुजांची अफजल, रेडका, राज पहारा आणि केदार इ.
बुरुजांचे अवशेष आजही दिसतात.
खालच्या मुख्य किल्ल्यात
१६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते स्थापना केलेले
तुल्जाभ्वानीचे मंदिर आहे. त्यासमोर दोन उंच दीपमाळा, नगारखाना इ. वास्तू आहेत.
भवानी देवीचे मुळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्यात होते. नंतर त्याचा जीर्णोध्दार
करण्यात आला. अफजलखान- शिवाजी महाराज यांची भेट आणि तेथे झालेला अफजलखानाचा वध हे
प्रतापगडाचे ऐतहासिक महत्व आहे. छत्रपती राजाराम जिंजीस जात असताना काही काळ ते
प्रतापगडावर वास्तव्यास होते. सखाराम बापू काही काळ येथे नजर कैदेत होते. नाना
फडणीसांनी काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.१९५७ मध्ये ५ मी. उंचीचा
शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा येथे उभारण्यात आला. त्याचे अनावरण पंडीत जवाहरलाल
नेहरू यांनी केले होते. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफजाखानाची कबर आहे. इ.
अनेक गोष्टीमुळे हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा