सातारा जील्याच्या
खटाव तालुक्यातील वर्धनगड हा प्रसिद्ध किल्ला आहे. वर्धनगडाची समुद्र सपाटीपासूनची
उंची १,०६५ मी. आहे. अखंड तटबंदी असलेल्या हा किल्ला आकर्षण आहे. गडावर चढून
जाताना वाटेत भैरोबाचे मंदिर दिसते. तेथून पुढे मुख्य दरवाजा लागतो. पुढे एका
लहानशा टेकडीवर वर्धनी मातेचे मंदिर आहे. गडाच्या जवळच्या परिसरातील ग्रामस्थांचे
वर्धनीमाता हे प्रमुख दैवत आहे. मंदिरापुढे मोठा चौथरा व सभामंडप आहे. वर्धनी
मातेची मूर्ती ही ढाल, तलवार या शस्त्रांनी सिद्ध अशी आहे. तसेच महादेवाचे मंदिरही
दिसते. वर्धन गडावरून महिमानगड, कल्याणगड, उत्तरेला संतोषगड असा परिसर लक्ष वेधतो.
१६६१ च्या दरम्यान स्वत: छत्रपती शिवाजी महाराज हे गडावर आले होते व काहीकाळ
त्यांनी येथे. मुक्कामही केला. १६७३ च्या सुमारास या गडाची पुर्नबांधणी करण्यात
आली. १७०० मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘सादिकगड’ असे ठेवले;
परंतु मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. नंतर १८१८ मध्ये हा
किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा