सातारा शहरापासून नांदगिरी हा अत्यंत जवळचा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून १,०७८ मी. उंचीवर हा किल्ला वसलेला आहे. पायवाटेने गडाकडे जाताना काही पायऱ्या चढल्यावर वाटेत बौध्दकालिन एक गुहा लागते. गुहेमध्ये एका खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराने आत जाताना समोर एक भव्य कातळ भिंत दिसते. तेथून पायऱ्यांनी खाली उतरल्यावर जलमंदिर दिसते. हे जलमंदिर नांदगिरी किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. गडावरील दुसऱ्या प्रवेशद्वाराने पुढे गेल्यावर हनुमानाचे मंदिर लागते. येथील हनुमानाची मूर्ती लहानसा असून येथे पाण्याचे तळे व दगडी वृंदावन आहे. गडावरून ज्र्ण्देश्व्राचा डोंगर, अजिंक्यतारा गड व यवतेश्वर इ. परिसर दिसतो. नांदगिरी किल्ला हा शिलाहार भोज राजाने बांधला. १६७३ मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. १७०१ मध्ये या किल्ल्यावर स्वारी करून ओरंगजेबाने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता; परंतु मराठ्यांनी तो पुन्हा युद्ध करून जिंकला. अनेक वर्षे या किल्ल्याचा ताबा पंतप्रतिनिधींकडे होता. १८१८ मध्ये ब्रीतीशांनी या किल्ल्यावर ताबा मिळविला. नांदगिरी किल्ला हा ‘कल्याणगड’ या नावाने ओळखला जातो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा