किल्ला रामशेज
नाशिक जिल्यातील आशेवाडी
गावाजवळ रामशेज नावाचा प्रसिध्द किल्ला
आहे. समुद्र सपाटीपासून ९८५ मीटरवर हा किल्ला वसवलेला असून प्रभू रामचंद्र जेव्हा
वनवासात होते तेव्हा या किल्ल्यावार त्यांचे काहीकाळ वास्तव्य होते. म्हणून रामाजी
शेज म्हणजे शैया या अर्थाने या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले.
किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराजवळ रामाचे मंदिर आहे. तेथून पुढे पायऱ्याने गडावर जाता येते.
किल्ल्याचे प्रवेशद्वार भग्रावस्थेत आहे. गडाच्या माचीवर गेल्यावर तेथे पाण्याची
टाकी तसेच गडावर धान्याची कोठारे, भगवती मातेचे मंदिर व दीपमाळ असून पडकी घरे व
तटबंदीचे अवशेष दिसतात. छत्रपती संभाजी राजांच्या कारकिर्दीत मोगलांनी हल्ला करून
गडाला वेढा आणि गडावर मात्र फार थोडे सैन्य, असे असतानाही मराठ्यांच्या वीर
सैनिकांनी गडावरून दगडांचा मारा करून मोगलांचा तोफांना तोंड दिले. जवळ जवळ साडेपाच
वर्ष हि रोमहर्षक झुंज सुरु होती. गडावर पुरेसे सैन्य आणि साधने नसताना मराठे
सैनिक चेटूक करीत नाहीत ना ? अशी शंका मोगलांना आली होती आणि अखेर १६८७ मध्ये
मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा