किल्ला दौलताबाद
दौलताबाद हा किल्ला
औरंगाबाद जिल्यातील एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. औरंगाबाद शहराच्या ईशान्येस
१४ कि.मी. अंतरावर वेरुळच्या रस्त्यावर एका शंकाकार डोंगरावर हा किल्ला आहे. ४.५०
कि.मी. परीघ असलेला तटबंदीचा हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची २२१ मी असून
याच्या प्राचीन इतिहासाबद्दल निश्चित माहिती नाही; परंतु असे म्हटले जाते की पाचवा
भिल्लम यादव याने ११८७ मध्ये या डोंगरावर किल्ला बांधून तेथे यादवांची राजधानी
केली. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिल्जी याने हा किल्ला घेतला. पुढे खंडणी देऊन
रामचंद्र यादव यास तो परत केला. मात्र मलिक काफुरने तीन वेळा हल्ले करून हरपाल
यादव यास फाशी देऊन हा किल्ला ताब्यात मिळविला. किल्ल्यावर असलेल्या विपुल
संपत्तीमुळे महंमद तुघलकाने त्याचे नाव दौलताबाद ठेवले. त्यानंतर बहामनी सत्ता,
अहमद निजामशाहा, नंतर शाहाजाहान पुन्हा निजाम अशाप्रकारे हा किल्ला वर्षोनवर्षे
वेगवेगळ्या सत्ताधिशांच्या हातात होता.
वास्तुशास्त्रदृष्ट्या
हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण असून बाजूनी खंदक आणि साकव आहेत. किल्ल्यावर पिण्याच्या
पाण्याची सोय आहे. अनेक गुप्तमार्ग, दरवाजे आणि शेकडो खोल्या आहेत. सर्वात उंच
असलेल्या भागास महाकोट म्हणतात. शंक्काकार बुरुज, चांदमिनार, नगारखाना, चीनिमहाल,
मशिदी आणि मंदिरेही या किल्ल्यावर आहेत. ह्या किल्ल्याचे बांधकाम अजूनही
पाहण्यासारखे असून प्रवाशांसाठी ते एक पर्यटन केंद्र झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा