किल्ला सुधागड
रायगड जिल्यातील भोर
संस्थानातील रायगड हा किल्ला समुद्र सापाठीपासून ३१९ मी. उंचीवर आहे. शिवशाहीतील
अत्यंत देखणा आणि बलदंड किल्ला म्हणून या किल्ल्याचा लौकिक आहे. भोरच्या पंत
सचिवांची कुलदेवता भोराईदेवी हि या किल्ल्यावर असल्याने अनेक वर्ष येथे उत्तम व्यवस्था
होती. अष्टविनायकांपैकी पाली गावापासून सुधागडला जाता येते. किल्याचे प्रवेशद्वार
हे दोन भक्कम बुरुजांमध्ये असून रायगडाच्या महाद्वारासारखेचं भव्य आणि सुबक आहे.
गडावरील भोराई देवीच्या मंदिराचे बांधकाम पंत सचिवाने १७५० मध्ये केले. या देवीची
स्थापना साक्षात भृगु ऋषींनी केली म्हणून भृगु आंबा व भोरांबा या नावाने पण ती
ओळखली जाते. मंदिरा शेजारी नक्षीकाम केलेल्या अनेक समाधी आहेत. पुढे एक शिवमंदिरही
आहे. गडावर झाडांमध्ये लपलेला सरकार वाडा आहे. वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे.
सुधागाद्चे क्षेत्रफळ सुमारे ५० एकराचे असून गडावर टकमक टोक आहे. इ.स. पू. २ शतकांपूर्वी
सुधागडची रचना झाली असे म्हणतात. १४३६ मध्ये बहमनी सुलतानाने गडाचा ताबा घेतला
होता. १६५७ मध्ये हा किल्ला शिवाराज्यांत दाखल झाला व तेव्हा या गडाचे सुधागड असे
नामकरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा