किल्ला राजगड
राजगड हा महत्वाचा डोंगरी
किल्ला असून शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची सुरवातीची राजधानी राजगड या
किल्ल्यावर होती. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वेल्हे गावापासून आग्नेयेला
साधारण १६ कि. मी. अतंरावर हा किल्ला आहे. राजगडाची समुद्र सपाटीपासून उंची १,३७६
मी. आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे या गावापासून पायवाटेने गडावर
जाता येते. या गावापासून राजगडाचा चढ सुरु होतो. ही वाट हत्ती, घोडे किंवा वाहन
जातील इतकी रुंद आहे. गडाच्या उत्तरेला पद्मावती, आग्रेयेला सुवेळा आणि नैऋत्येला
संजीवनी अशा तीन चिलखती म्हटले जाते. किल्ल्यावर येण्यासाठी गुंजपा, पाली, आळू आणि
काळेश्वरी असे चार दरवाजे आणि तीन दिंड्या आहेत. पद्मावती हि माची बरीच मोठी
असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती या माचीवर होती. तसेच सुवेळा, संजीवनी आणि
बालेकिल्ला यावरही वस्ती होती. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबासह
बालेकिल्ल्यावर राहत असत. या गडावरची मुख्य देवता पद्मावती ही आहे. तिचे मंदिर
पद्मावती माचेवर आहे. या तेनही माच्या आणि बालेकिल्ल्यावर गणेश, मारुती,
ब्रहार्षी, काळेश्वरी आणि भागीरथी याची लहान मोठी मंदिरे आहेत. याशिवाय दारूखाना, दिवाणघार, राजवाडा आणि पागा या
वास्तूही तेथे आहेत. प्रत्येक माचीवर पाण्याची व्यवस्था आहे. शिवाजी महाराजांनी
अनेक गड ताब्यात घेताना त्यात मुरमदेव हा गड ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव
दिले. तिथे आपली राजधानी वसविली. शिवाजी महाराजांची राजधानीच असल्यामुळे या
किल्ल्यावर अनेक खलबतं होऊन अनेक ल्धायांचे निर्णय आणि विजयोत्सव साजरे केले गेले.
अशा तऱ्हेने राजगड हा महत्वाचा इतिहासाचा साक्षीदार आहे.

Nice one dada
उत्तर द्याहटवा